यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी.
यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी. भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशासाठी थोडीफार सेवा करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु, काही अडचणींमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे सगळ्यांनाच ही संधी मिळते असे नाही. संरक्षण क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर भरपूर संयम आवश्यक असतो. म्हणूनच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणा-यांची संख्याही तुलनेने कमी असते. यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात. कारण कुठलेही असले तरीही वर्षातून काही आठवडेच सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर अशांसाठी लेफ्टनंट होण्याची संधी नक्कीच उपलब्ध आहे. भारतीय सैन्यात सैन्य अधिका-यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. अशा परिस्थितीत ही सेवा देशाला नक्कीच उपयोगाची ठरू शकेल. लष्करातील करिअरची ही वेगळी वाट जाणून सैन्यदलात लेफ्टनंट होता येऊ शकते. हा अभ्यासक्रम असणा-या प्रादेशिक सैन्यदलाचे मुख्य कार्यालय पुण्यातील घोरपडी येथे आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम पुस्तकाचे परिणामकारक वाचन होणे आवश्यक आहे. एक गुणाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करताना प्रत्येक पाठातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करायला हवी. उदाहरणार्थ, `के 2' हे भारतातील सर्वांत उंच शिखर आहे. किबिथू हे भारताचे पूर्वेकडील परमस्थान आहे. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न केवळ स्वाध्यायांपुरते मर्यादित नाहीत, तर पाठ्यपुस्तकातील कोणत्याही भागातून विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पाठात चौकटीत जी माहिती दिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा. 1) शुभस्य शीघ्रम कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. MPSC-Mahaonline-Mpsconline एकदा का लेखी परीक्षेत तुम्ही पास झालात की पुढची पायरी असते ती मुलाखतीची.
आता या मुलाखतींऐवजी उमेदवारांमध्ये ग्रुप डिस्कशनचा पर्याय सगळे जण वापरतात. त्यासाठी निर्धारित अधिकारी एक तर या उमेदवारांबरोबर चर्चेला बसतात विंâवा मग या ग्रुप डिस्कशनचं चित्रीकरण करून ते नंतर पाहिलं जातं. या चित्रीकरणांचा वापर करून मग योग्य तो उमेदवार निवडला जातो. दहावी-बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू या!
दहावी-बारावीच्या निकाल लागल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. आज सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न भेडसावित आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. पण युवकांनी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याला सहज प्रशासनात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी थोडी मेहनत काळजीपूर्वक, सातत्याने व आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे. एमपीएससी, युपीएससी याशिवाय बँका तसेच इतर अनेक संस्थांच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कशी करावी? त्याचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात? याविषयी या परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन...
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|